२१ नोव्हेंबर २००३ ची रात्र. महाराजांचे आरोग्य चांगले होते. कोणालाही कल्पना नव्हती पण त्या रात्री अचानक मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले, बराच वेळ प्रयत्न करून हि त्यांना बरे वाटत नव्हते, म्हणून त्यांनी त्यांचे शिष्य डॉक्टर राजेश गायकवाड ह्यांना फोन करण्यास सांगितले आणि डॉक्टरांनी फोनवरूनच महाराजांच्या मुलांना सागिंतले कि महाराजांना इस्पितळा मध्ये नेण्याची गरज आहे. त्यांना हरकिसनदास इस्पितळ म्हणजे आताचे रिलायन्स इस्पितळा मध्ये हलविण्यास सांगितले व स्वतः तिकडे लगेच पोहचतो आणि ते तिथे पोहचले. डॉक्टर राजेश गायकवाड यांनी डॉक्टर गोडबोले ह्यांना ही हरकिसनदास इस्पितळा मध्ये बोलिवले. महाराजांचे हार्ट फैल झाले होते आणि जवळपास सगळेच हृदय बंद झाले होते. इस्पितळात कॅज्युलटी विभागात महाराजांना नेण्यात आले तिथे डॉक्टरांना केस हाताच्या बाहेर गेल्याचे कळले पण राजेश डॉक्टरांनी, गोडबोले डॉक्टर व इतर हॉस्पिटलचे चार डॉक्टर यांना बरोबर घेऊन अतोनात प्रयत्न केले. जवळ जवळ अर्धा ते पाऊण तास प्रयत्नांची पराकाष्ट केल्या वर हृदय पुन्हा कार्यरत झाले व सगळ्यांना जीवात जीव आला. मग महाराजांना ताबडतोब अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आणि सर्व उपचार सुरु केले, सगळे डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करीत होते.
साधकांनी इस्पितळा मध्ये बाबांच्या सेवे करिता कोणी आणि कसे कुठल्या वेळेत हजर राहायचे ह्याचे सर्व नियोजन केले आणि त्याच प्रमाणे पूर्ण शिस्त सांभाळून गुरुसेवेचं कार्य सुरु झाले.
दिवसां मागून दिवस सरत होते आणि एके दिवशी महाराजांनी त्यांच्या मुलीला म्हणजे सौ. अनिला शेषराज माने ह्यांना हसत हसत सांगितले कि '' हे डॉक्टर मला काय बरे करणार माझी तर जायची तयारी झाली आहे''. पण त्याच दिवसांत दत्तजयंतीचा सप्ताह जवळपास होता. महाराज ह्या काळात गुरुचरित्राचे पारायण करीत असत पण आता प्रकृती बारी नसल्या मुळे ते शक्य नव्हते पण ते इस्पितळा मध्ये असून त्यांनी घरच्यांना आणि साधकांना स्पष्ट सांगितले कि मी जरी इस्पितळा मध्ये असलो तरीही दत्तजयंतीचा सप्ताह आणि उत्सव दर वर्षी प्रमाणे संपन्न झाले पाहिजे आणि त्यासाठी सर्व तयारी करा.
महाराजांच्या आदेशा प्रमाणे सर्व तयारी झाली आणि दत्तजयंतीचा सप्ताहाचा आरंभ झाला. रोजचे गुरुचरित्राचे पाठ बाबांच्या घरी त्यांची घरची मंडळी, ब्राह्मण गुरुजी आणि साधक करत होते, सायंकाळी आरती होत असे.
हळू हळू बाबांची प्रकृती खालावत चालली होती, त्यांच्या मूत्रपिंडावर परिणाम होत होता. डॉक्टर राजेश गायकवाड व इतर डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ट करीत होते पण कशालाही यश येत नव्हते. आता त्यांचे डायलेसिस सुद्धा सुरु झाले. काळजी खूपच वाढत होती.
माईंनी आणि मुलांनी विचार केला कि बाबांची तब्यात लवकर बरी व्हावी त्या करीत गणपती अथर्वशीर्ष ब्राह्मण गुरुजीं द्वारे दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ०९ डिसेंबर २००३ सकाळी करण्याचे नियोजीले. दत्तजयंतीचा दिवस उगविला आणि साधक परिवार दर्शनास येऊ लागले. बाबांचा धाकटा मुलगा अमित हे बाबांना भेटण्यास इस्पितळात गेले तेव्हा बाबा डोळे बंद करून शांत निजले होते. थोडी वाट पाहून अमित ह्यांनी बाबांना सांगण्याचा प्रयत्न केला कि आज दत्तजयंती आहे आणि घरी उत्सव आहे, त्यावर बाबांनी लगेच धीम्या आवाजात उत्तर दिले कि ''हो माहित आहे मी तिथेच आहे''. हे ऐकल्यावर अमित समजले कि बाबा साधनेत आहेत आणि ते अदृश्यरूपात घरी उपस्तिथ आहेत म्हणून अमित बाबांना आणखी काही न बोलता तेथून घरी निघून आले.
सायंकाळी श्रीदत्त प्रभूंचा पाळणा उत्सव ही झाला. आलेले सर्व साधक सुद्धा बाबांची प्रकृतीची विचारपूस करीत होते आणि परमात्म्याकडे बाबांकरिता प्रार्थना करीत होते.
सोमवार ८ डिसेंबर २००३ बाबांच्या इच्छा आणि आदेशा प्रमाणे दत्तजयंतीचा सप्ताह व उत्सव पार पडला. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ९ डिसेंबर २००३ ला गणपती अथर्वशीर्ष कार्याची सर्व तयारी झाली होती. ब्राह्मण गुरुजी ही सकाळी यायचे पक्के झाले होते. अवकाश होता ती रात्र जायची आणि दुसरा दिवस उजाडण्याचा.ठरल्या प्रमाणे गणपती अथर्वशीर्ष कार्याची संपूर्ण तयारी केली गेली आणि ब्राह्मण गुरुजी ही वेळेत आले. कार्य सुरु होणार इतक्यात फोन वाजला आणि तो होता साधक श्री प्रवीण चव्हाण ह्यांचा कि बाबांची तब्येत फारच बिघडली आहे आणि बाबांना त्यांच्या वॉर्ड मधून दुसऱ्या विभागात घेऊन जात आहेत. तुम्ही लवकर या. बाबांचा थोरला मुलगा अजित हे गणपती अथर्वशीर्ष करावयास बसले होते तर धाकटा मुलगा अमित हे जलद गतीने इस्पितळात गेले. तिथे गेल्यावर बघितलं कि अनेक डॉक्टर प्रयत्न करत होते. बाबांना ताबोडतोब डायलेसिस वर ठेवले, शॉक ट्रीटमेंट देण्यात अली. तेथील उपस्तिथ असलेल्या मोठया डॉक्टरांना असे वाटले कि जे इस्पितळातले डॉकटर २१ नोव्हेंबर च्या रात्री होते आणि ज्यांना यश आले होते त्यांना लगेच बोलवावे आणि त्यांच्या हाताने उपचार करावेत. तसे हि करून पहिले बाबा व्हेंटिलेटरवर होते पण काही यश आले नाही. तेव्हा सकाळी ०९.०० वाजता डॉक्टरांनी घोषित केले कि बाबांनी प्राण सोडले.
बाबांनी आपला श्वास दत्तजयंती उत्सव पार पडे पर्यंत रोखले होते. जसे गणपती अथर्वर्शीर्षला सुरवात होणार तितक्यात त्यांनी आपले देहरूपी स्वरूप त्यागिले. बाबांनी जर अगोदर देह त्यागला असता तर दत्तजयंती उत्सवात खंड पडला असता, असे त्यांना कदापि होऊन द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी आपला श्वास रोखून ठेवला आणि मृत्यूला पुढे ढकलले.
जसे डॉक्टरांनी बाबांच्या मृत्यू घोषित केला तसाच पहिला फोन घरी करण्यात आला आणि ही अत्यंत दुःखद बातमी कळवली, हे समजल्यावर सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रत्येक साधक बंधू आणि भगिनींनी आपापल्या परिवारांना, मित्रांना आणि माहितीतल्या साधकांना कळविले.
बाबांचा देह त्यांच्या राहत्या घरी आण्यात आला आणि बघता बघता हि दुःखद बातमी सगळीकडे पसरली. साधकांची, नातेवाईकांची, इतर भाविकांची आणि गिरगांवातल्या रहिवाश्यांनी बाबांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी रीघ वाढू लागली.
दूर दूर हुन साधक मुंबई कडे निघू लागले पुणे, सातारा, कोल्हापूर, वाई, अलिबाग, चिपळूण, रत्नागिरी व अन्य ठिकाणं हुन.
सायंकाळी महाराजांचा देह घराच्या कंपाऊंड मध्ये दर्शनास ठेवण्यात आला आणि सर्वांचे दर्शन घेऊन झाल्यावर फुलांनी सुशोभित केलेल्या ट्रकवर ठेवण्यांत आला आणि अंत्ययात्रेला सुरवात झाली. मरिन लाईन्स चंदनवाडी स्मशानभूमीत भडाग्नी देऊन कार्य करण्यात आले.
दशक्रिया विधी दादर स्मशानभूमीत करण्यात आली आणि बाबांचे अस्थी विसर्जन हरिहरेश्वरला करण्यात आले.
अस्थिविसर्जन करायला हरिहरेश्वरला जाताना सुद्धा एक सुंदर अनुभव बाबांच्या प्रचितीचा आला. बाबांची दोन्ही मुले दोन जावई काही मोजके साधक आणि नातेवाईक गाडीने हरिहरेश्वरच्या मार्गाला लागले. बाबांचे थोरले चिरंजीव अजित गाडी चालवत होते आणि धाकटे चिरंजीव अमित बाबांच्या अस्थी कलश घेऊन गाडीत मधल्या सीटवर बसले होते. प्रथम अमित ह्यांना सुंदर सुगंध अस्थी कलशा मधून येत आहे हे अनुभवले पण ते शांत राहिले. इतरांना हि हा मनमोहक सुगंध येत होता पण नक्की कोठून ते कळत नव्हते. अखंड यात्रेत हा सुगंध गाडीत बसलेल्यांचे मन प्रसन्न करीत होता. हरिहरेश्वरला पोहचल्यावर गाडीतून उतरल्यावर प्रथम साधक श्री विजय पवार ह्यांनी विचारले कि कोणी अत्तर किंवा पर्फुम लावलाय का तर सगळ्यांचे उत्तर होते नाही.... मग हा अप्रतिम मनमोहक सुगंध येतो कोठून तेव्हा अमित यांनी सांगितलं कि ह्या अस्थी कलशातून हा अप्रतिम मनमोहक सुगंध येत आहे. सर्व मंडळींनी अस्थी कलशाच्या जवळ येऊन खात्री केली आणि अस्थी कलशाला नमन करून अदभूत अनुभव आला आणि सर्व उपस्थित कृतज्ञ झाले. ह्याच अनुभवाने सर्व मंडळी मंत्रमुग्ध होऊन मुंबईला परतले.
ह्याच अर्थे महाराजांनी दर्शिवले कि जरी ते देहरुपात नसले तरी ते ह्या वातावरणात ह्या अप्रतिम मनमोहक सुगंधा प्रमाणे आजही वावरत आहेत. त्यांची शक्ती अजून हि कार्यरत आहे, त्यांची कृपा, प्रेम आणि मार्गदर्शन सदैव साधक आणि उपासकांच्या वर असते.
वर